परळी तालुक्यातील जळगव्हाण गावचे सरपंच व भाजपा बूथ प्रमुख वसंत ताराचंद चव्हाण यांचा बुधवार दि 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता, भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ते पत्नी व नातीसोबत बुलेटवरून सिरसाळ्याकडे जात असताना पांगरी पेट्रोल पंपाजवळ एका वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात सरपंच चव्हाण आणि त्यांची नात जागीच ठार झाली, तर पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.