ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हा व विभागात पुरस्कार मिळवलेल्या खैरी वलमाझरी येथे तान्हापोळ्याचे निमित्त साधून सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांनी माझी वसुंधरा अभियान 6.0 या अभियानाचे प्रचार व प्रसिद्धी केली.गाव प्रदूषण मुक्त होऊन पर्यावरण पूरक सण व उत्सव साजरे करण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि23आँगष्टला सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते