अमरावती: आगामी निवडणुकित ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत: माजी मंत्री यशोमती ठाकूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुक आयोगाने ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. परंतू पंचायत समिती स्तरावर मतदार याद्या ठेवण्यात आल्या आहेत. हे केवळ वोट चोरीच्या उद्देशाने सुरु आहे. बुथ निहाय मतदार याद्या निवडणुक आयोग उपलब्ध करुन देत नाही. लोकशाहीत सर्वसामान्य जनतेचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. फोटोसह मतदारयाद्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.