क्रांतिकारी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक आज जबरदस्त उत्साहात, संघर्षाची जिद्द मनात घेऊन पार पडली. जिल्हाभरातून हजारो क्रांतिकारी मावळे उपस्थित राहिल्याने सभेला प्रचंड ऊर्जा मिळाली आणि शेतकरी चळवळीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली.या बैठकीत सोयाबीन–कापसाचा भावफरक, संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांचा वाढता उपद्रव, शेतीसाठी मजबूत कंपाऊंड, शेतमजुरांसाठी महामंडळाची गरज, पिककर्जातील अडचणी असे शेतकऱ्यांच्या जगण्याशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर थेट, तडाखेबंद चर्चा झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळवण्यासाठी “जर आचारसंहितेतून वेळ मिळाला, तर भव्य आंदोलन उभे करायचे!” हा निर्णय आज एकमुखाने सभेत झाला.