जळगाव: अजिंठा घाटाजवळ भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; दोन जण गंभीर; रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
पुणे येथून जळगावकडे परतणाऱ्या कारला भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने मिताली सुभाष पाटील (वय ५८, रा. विनोबा नगर, जळगाव) या ठार झाल्या. तर त्यांचे पती सुभाष राजाराम पाटील (वय ६०) व चालक योगेश बारी (वय ३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.